“भारताची अंतर्गत सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चिंतेचा विषयही झाला आहे. आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे
या इ-पुस्तकात भारताच्या “अंतर्गत सुरक्षे”शी संबंधित लेखांचे संकलन करुन ते वाचकांपर्यंत आणले आहे. ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे.
स्वत: युद्धभूमीवर शत्रूचा सामना केल्यामुळे त्यांच्या लिखाणात सुरक्षेविषयीची कळकळ आणि ढोंगी राजकारणाबद्दलची चिड जाणवते. त्यांचे लिखाण अत्यंत मोकळेपणाने आणि कोणतीही भीड न ठेवता केलेले असते. त्यामुळेच ते वाचकांना भावते.