लॉकडाऊन नंतरचे जग कसे असेल? ग्राहकांची मानसिकता कशी असेल? कर्जे काढून उभे केलेले व्यवसाय टिकतील का? उद्योग व्यवसायात कोणते बदल करावे लागतील? काही नव्या कौशल्यांचा अंगीकार करावा लागेल का ? लॉकडाउन नंतर काही नव्या संधी उपलब्ध होतील का? असे शेकडो प्रश्न उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना सतावत आहेत. सरकारने व्यवसायासाठी सोयीसुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले असले, काही महिने बँकांच्या कर्ज हप्त्यात सवलत मिळाली असली. तरी लॉकडाऊन नंतर निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांना, स्वतः व्यावसायिकाला तोंड द्यावे लागते हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
कोणतेही संकट कधी एकटे येत नसते .आपल्याबरोबर अनेक दृश्य आणि अदृश्य संधींचे वहन ही संकटे करीत असतात. संकटांना घाबरून जाण्याची मानसिकता उद्योजक व व्यवसायिकांची कधीच नसते. मुळात व्यवसायाची उभारणी करतानाच संकटांचा व धोक्यांचा सामना करण्याची मानसिकता उद्योजकाने तयार केलेली असते. म्हणून येणारी संकटे उद्योजकांना मार्गदर्शकच ठरत असतात. येणाऱ्या प्रत्येक संकटात लपलेल्या संधीचा शोध घेतला. तर एक नवा व्यवसाय उद्याला येऊ शकतो. आहे त्या व्यवसायात संकटांचा अभ्यास करून थोडासा बदल केल्यास. आपण इतरांपेक्षा संकटातुन लवकर सावरू शकतो. म्हणून व्यवसायिकांनी भविष्याचा वेध घेणारे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. बाजारपेठेतील छोटे बदल व त्याचे होणारे परिणाम समजावून सांगणाऱ्या पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे. अशी पुस्तके संग्रही ठेवली पाहिजेत. “लॉकडाऊन नंतरच्या व्यवसाय संधी” हे पुस्तक याच टप्प्यावर उद्योजक व व्यावसायिकांना मदत करेल. नव्याने व्यवसायात येऊ पाहणाऱ्यांना किंवा नोकरी गेल्यामुळे व्यवसायाचा विचार करणाऱ्यांना एक नवी दिशा दाखवण्याचे काम हे पुस्तक करेल. अगोदरपासूनच व्यवसायाचा अनुभव असणाऱ्यांनाही या पुस्तकातील नव्या कल्पना व्यवसायाच्या भरभराटीसाठी मार्गदर्शन करतील, लक्षात असू द्या जगण्याच्या वाटेवर संकटे ही येतच असतात. संकटा समोर लोटांगण घालणे हा मानवी स्वभाव नाही. मानवी इतिहासाची पाने चाळल्यास संकटांमधूनही संधीचा शोध घेणाऱ्या उद्योजकांनी जगाचा इतिहास घडवला आहे. प्रकाशक ई-बुकची मूळ किंमत रु ९९/- आजच डाऊनलोड करा....